Thursday, 30 April 2009

भटक्या

आठवड्याभराच्या कामानंतर शनिवार येतो
थकलेल्या मनावर एक जादू करतो

दबलेल्या इच्छा उफाळून
बाहेर येतात
कल्पनांना नवीन धुमारे फुटतात

झाडांची सळसळ , पक्ष्यांची किलबिल

बाहेरून येते एक साद
मन चुकता देत प्रतिसाद

भटकंतीचे सामान धूळ झटकून बाहेर पडत
मळखाऊ कपडे चढ़वून मन उडायला तयार होत

आता उन, वारा, थंडी, पाउस कशाचीही तमा नसते
कानामध्ये फक्त संह्याद्रिची साद असते ,
संह्याद्रिची साद असते

- पिनाकिन कर्वे

No comments: